आरक्षणासाठी आता आरपारची लढाई;अखंड मराठा समाजाचे मुंबई मोर्चात सामील होण्याचे आवाहन

श्रीरामपूर –शहरातील व ग्रामीण भागातील मराठा समाज बांधवांनी सरसकट मराठा आरक्षणाच्या लढाईत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.त्याकरिता येत्या २९ ऑगस्ट रोजी मुंबईतील...

श्रीरामपूर –
शहरातील व ग्रामीण भागातील मराठा समाज बांधवांनी सरसकट मराठा आरक्षणाच्या लढाईत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.त्याकरिता येत्या २९ ऑगस्ट रोजी मुंबईतील मोर्चात हजारोंच्या संख्येने सामील होण्याचे आवाहन अखंड मराठा समाज श्रीरामपूर च्यावतीने करण्यात आले आहे.मुंबई मोर्चाच्या नियोजनासाठी शहरात व ग्रामीण भागात बैठक घेऊन जनजागृती केली जात असून त्याकरिता अखंड मराठा समाजाचे मराठा सेवक मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करीत आहेत. मुंबई मोर्चा संदर्भात माहिती देऊन श्रीरामपूर तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी भविष्यातही एकत्रित राहून विविध उपक्रम साजरे करण्याचे आवाहन करून सविस्तर मार्गदर्शन केले जात आहे.मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ओबीसीतून सरसकट मराठा बांधवांना आरक्षण मिळावे याकरिता ही शेवटची लढाई आहे. त्याकरिता दिनांक २७
ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी येथून निघणाऱ्या या मोर्चात लाखो समाज बांधव सामील होणार असून दिनांक २९ ऑगस्ट रोजी आझाद मैदान,मुंबई येथे हा मोर्चा पोहोचणार आहेत.या मोर्चात श्रीरामपूर तालुक्यातील मराठा समाजाबरोबरच इतरही समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. त्याकरिता अखंड मराठा समाज श्रीरामपूर च्यावतीने श्रीरामपूर शहरात विविध भागात तर ग्रामीण भागातील विविध गावांमध्ये नियोजन बैठक घेतली जात आहे.या बैठकांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. या मोर्चाकरिता काही बांधव दि.२७ ऑगस्टला श्रीरामपूर वरून अहिल्यानगर येथे सहभागी होणार आहेत तर ग्रामीण भागातील काही  बांधव ट्रॅव्हल्स बस व खाजगी वाहनांनी दि.२८ ऑगस्ट रोजी शिवनेरीहून मोर्चात सहभागी होणार असल्याचे सांगितले.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!