आरक्षणासाठी आता आरपारची लढाई;अखंड मराठा समाजाचे मुंबई मोर्चात सामील होण्याचे आवाहन

श्रीरामपूर –शहरातील व ग्रामीण भागातील मराठा समाज बांधवांनी सरसकट मराठा आरक्षणाच्या लढाईत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.त्याकरिता येत्या २९ ऑगस्ट रोजी मुंबईतील...

श्रीरामपूर –
शहरातील व ग्रामीण भागातील मराठा समाज बांधवांनी सरसकट मराठा आरक्षणाच्या लढाईत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.त्याकरिता येत्या २९ ऑगस्ट रोजी मुंबईतील मोर्चात हजारोंच्या संख्येने सामील होण्याचे आवाहन अखंड मराठा समाज श्रीरामपूर च्यावतीने करण्यात आले आहे.मुंबई मोर्चाच्या नियोजनासाठी शहरात व ग्रामीण भागात बैठक घेऊन जनजागृती केली जात असून त्याकरिता अखंड मराठा समाजाचे मराठा सेवक मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करीत आहेत. मुंबई मोर्चा संदर्भात माहिती देऊन श्रीरामपूर तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी भविष्यातही एकत्रित राहून विविध उपक्रम साजरे करण्याचे आवाहन करून सविस्तर मार्गदर्शन केले जात आहे.मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ओबीसीतून सरसकट मराठा बांधवांना आरक्षण मिळावे याकरिता ही शेवटची लढाई आहे. त्याकरिता दिनांक २७
ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी येथून निघणाऱ्या या मोर्चात लाखो समाज बांधव सामील होणार असून दिनांक २९ ऑगस्ट रोजी आझाद मैदान,मुंबई येथे हा मोर्चा पोहोचणार आहेत.या मोर्चात श्रीरामपूर तालुक्यातील मराठा समाजाबरोबरच इतरही समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. त्याकरिता अखंड मराठा समाज श्रीरामपूर च्यावतीने श्रीरामपूर शहरात विविध भागात तर ग्रामीण भागातील विविध गावांमध्ये नियोजन बैठक घेतली जात आहे.या बैठकांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. या मोर्चाकरिता काही बांधव दि.२७ ऑगस्टला श्रीरामपूर वरून अहिल्यानगर येथे सहभागी होणार आहेत तर ग्रामीण भागातील काही  बांधव ट्रॅव्हल्स बस व खाजगी वाहनांनी दि.२८ ऑगस्ट रोजी शिवनेरीहून मोर्चात सहभागी होणार असल्याचे सांगितले.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!