श्रीरामपूर-
तालुक्यातील वडाळामहादेव बसस्थानक ते जलसंपदा कार्यालय (वडाळा बंगला) या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली असून प्रशासनाने या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरु करण्याची मागणी आहे.अन्यथा येथील रहिवाशांचे वतीने श्रीरामपूर-नेवासा रस्त्यावर रास्ता राेकाे आंदाेलन करण्याचा इशारा वडाळामहादेव सेवा संस्थेचे चेअरमन दिलीपराव पवार यांचेसह येथील नागरिकांनी दिला आहे.वडाळामहादेव येथे जलसंपदा विभागाचे शाखा कार्यालय असलेने परिसरातील शेतकरी, जलसंपदा विभागाचे कर्मचारी यांची येथे माेठी वर्दळ असते, तर कार्यालयाच्या जवळच स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. बसस्थानक चाैक ते जलसंपदा कार्यालय हा साधारण अर्धा किलोमीटर रस्ता आहे. इंग्रजांच्या काळात दगडमातीचा माेठा भराव टाकून हा रस्ता तयार करण्यात आला हाेता. त्यानंतर १९९३ साली या रस्त्याचे काम जलसंपदा विभागाने केले हाेते. मात्र गेल्या ३२ वर्षांपासून या रस्त्यावरील एक खड्डेही जलसंपदा विभागाने बुजविले नाही. आजपर्यंत अनेकदा स्थानिक नागरिकांनी स्वखर्चाने या रस्त्यावरील खड्डे बुजविले.सध्या या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावर माेठ माेठे खड्डे पडल्याने चारचाकी वाहनेच काय, पण पायी चालणेही अवघड झाले आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या शेतकरी, कर्मचारी, शालेय विद्यार्थी तसेच स्थानिक रहिवाशांना माेठया गैरसाेयीला सामाेरे जावे लागत आहे. सध्या पाऊस सुरु असल्याने या रस्त्यावर प्रचंड चिखल झाला असून नागरिकांना चिखलातून वाट काढत जावे लागत आहे. अपघाताची शक्यता येथे निर्माण झाली आहे. अनेक लाेकप्रतिनिधींनी या रस्त्याचे काम सुरु करण्याचे आश्वासन दिले, मात्र या रस्त्याच्या कामाला अद्यापही मुहूर्त मिळाला नाही.पावसाने उघडीप दिल्यानंतर प्रशासनाने या रस्त्याचे काम तातडीने सुरु करावे, अन्यथा येथील रहिवाशांचे वतीने श्रीरामपूर-नेवासा रस्त्यावर रास्ता राेकाे आंदाेलन करण्याचा इशारा दिलीपराव पवार यांचेसह येथील नागरिकांनी दिला आहे.
