पायी दिंडीच्या वारकऱ्यांना ९०० रेनकोट वाटपाचा उपक्रम | Shrirampur Live

श्रीरामापूरमधील हार्दिक उपक्रमाबद्दल वाचा, जिथे संत तुळशीराम महाराज पडाई दिंडीतील ९०० भाविकांना पंढरपूरच्या यात्रेदरम्यान पावसाळ्यापासून संरक्षण करण्यासाठी रेनकोट देण्यात आले.

श्रीरामपूर (प्रतिनिधी):
पंढरपूर आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संत तुळशीराम महाराज पायी दिंडी मुठेवाडगाव, कारेगाव व टाकळीभान येथील अनेक भाविक वारकरी पंढरपूरकडे प्रस्थान करत आहेत. या दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना पावसाच्या त्रासापासून संरक्षण मिळावे यासाठी मिरजगाव येथे एक स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला.

या उपक्रमांतर्गत सुमारे ९०० भाविकांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम श्रीरामपूर पंचायत समितीचे माजी सभापती दीपक पटारे, पुणे येथील उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते अविनाशजी कुलकर्णी, श्रीरामपूर मार्केट कमिटीचे संचालक गिरधर आसने आणि भाजप तालुका सरचिटणीस डॉ. शंकरराव मुठे यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला.

“मानव सेवा हीच ईश्वर सेवा” या विचारातून हे रेनकोट वाटप करण्यात आले असून, पावसाळी हवामानात वारकऱ्यांना चालताना त्रास होऊ नये, हा यामागचा मुख्य हेतू असल्याचे डॉ. मुठे यांनी सांगितले.

या प्रसंगी अनेक दिंड्यांना सदिच्छा भेटी देण्यात आल्या व सर्व भाविकांचे स्वागत सन्मानपूर्वक करण्यात आले.

कार्यक्रमावेळी श्रीराम संघाचे रामेश्वर मुठे, मारुती जासूद, प्रदीप मुठे, जालिंदर मुठे, साईनाथ मुठे, ओम मुठे, वेदांत मुठे आदी उपस्थित होते. या उपक्रमामुळे वारकऱ्यांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण निर्माण झाले.

याप्रकारचे सामाजिक उपक्रम वारकरी संप्रदायाला बळ देणारे असून, भाविकांच्या सेवेसाठी समाजातील पुढाकार घेणाऱ्या लोकांचे कौतुक सर्वत्र होत आहे.

Leave a Comment

संबंधित बातम्या

भगवंताचे नामस्मरण हीच खरी  संपत्ती-मंहत रामगिरी महाराज;शनी देवगाव येथे गोदातीरी अवतरली प्रतिपंढरी

श्रीरामपूर-हरिनाम व रामनाम घेतल्याने पाप नष्ट होते.मनुष्याला व्यसन लागल्यावर ते सुटत नाही परंतु संताच्या सान्निध्यात आल्यामुळे त्याच्या जिवनात बदल होतो.भगवंताचे नामस्मरण हीच खरी संपत्ती आहे.विस पंचवीस वर्षापूर्वी काही  थोरामोठ्यांचे,संताचे चरित्र पाठ्यपुस्ताकात

कोकणातील अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात येणार-जलसंपदा मंत्री विखे पाटील;नदीजोड प्रकल्पाच्या पहिल्या कार्यालयाचे लोकार्पण

श्रीरामपूर- ‘नदीजोड’च्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे कोकणातील अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात येणार असून पर्जन्यछाया असलेल्या भागांमध्ये जलसिंचनाची मोठी सुविधा उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.नाशिक

साधू संताच्या संगतीने मानवी आयुष्याचे सोने-मंहत रामगिरी महाराज;शनि देवगाव सप्ताहात गोदावरी नदीतीरी लाखो भाविकांची मांदियाळी

श्रीरामपूर-मानवाच्या मन व बुद्धी यांचे शुद्धीकरण करण्यासाठीच आपल्या साधुसंतांनी अखंड हरिनाम सप्ताह सारख्या परंपरा सुरू केल्या.ज्याप्रमाणे परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते,त्याचप्रमाणे साधू संताच्या संगतीने मानवी आयुष्याचेही सोने होते,असे प्रतिपादन महंत रामगिरीजी

लोणी खुर्द येथे घरकुलासाठी ४७ गुंठे जागेचा प्रस्ताव शासनाकडे- मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील; ८ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन उत्साहात

श्रीरामपूर-लोणी खुर्द येथील भीमनगर वसाहतीमधील रहिवाशांना त्यांच्या हक्काचे घरकुल मिळावे, यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. शासनाच्या मालकीची ४७ गुंठे जागा निश्चित करून तिचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड

श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत  अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी

अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती

Latest News

Trending News