प्रांत कार्यालयावर शेतकऱ्यांचा आक्रोश;कर्जमुक्ती अन गोवंश हत्या बंदी कायद्यात सुधारणा करण्याची मागणी

श्रीरामपूर-नितीन शेळकेविदेशी जर्सी व होलस्टीन भाकड गाई–गोऱ्ह्यांच्या प्रश्नासह शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय बुधवारी (दि. २१ ऑगस्ट) श्रीरामपूरात पेटला.अहिल्यानगर जिल्हा शेतकरी संघटनेतर्फे प्रांत...

श्रीरामपूर-नितीन शेळके
विदेशी जर्सी व होलस्टीन भाकड गाई–गोऱ्ह्यांच्या प्रश्नासह शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय बुधवारी (दि. २१ ऑगस्ट) श्रीरामपूरात पेटला.अहिल्यानगर जिल्हा शेतकरी संघटनेतर्फे प्रांत कार्यालयावर धडक दिलेल्या आक्रोश मोर्चात “संपूर्ण कर्जमुक्ती करा, गोवंश हत्या बंदी कायद्यात सुधारणा करा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा ऍड. अजित काळे व जिल्हाध्यक्ष अनिलराव औताडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांना सविस्तर निवेदन दिले. यावेळी ऍड. अजित काळे म्हणाले की, गोवंश हत्या बंदी कायदा हा शेतकऱ्यांसाठी शाप ठरला आहे. हा कायदा केवळ धार्मिक आणि राजकीय हेतूंसाठी आणण्यात आला असून त्याचा परिणाम शेती आणि दूध व्यवसायावर गंभीर स्वरूपात झाला आहे. देशी गोवंशाचा सन्मान व संवर्धन करणे आवश्यक आहे; मात्र विदेशी भाकड जनावरांचा प्रश्न सोडवण्यासाठी कायद्यात सुधारणा करून त्यांना वगळणे अपरिहार्य आहे. “जर शासनाने वेळीच दखल घेतली नाही, तर हजारो शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त होईल आणि शेतकरी आत्महत्यांची मालिका थांबवणे कठीण जाईल,” असा इशारा त्यांनी दिला.
यात विदेशी जनावरे गोवंश हत्या बंदी कायद्याच्या कक्षेबाहेर काढावीत, देशी गोवंशावरच बंदी लागू रहावी, वन्यप्राणी संरक्षण कायदा रद्द करावा, भेसळयुक्त दुधावर बंदी आणावी, तसेच शेती साहित्याच्या वारंवार होणाऱ्या चोरीवर नियंत्रण ठेवावे अशा मागण्या करण्यात आल्या. “शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी आत्महत्येला प्रवृत्त होत असून ही परिस्थिती बदलली नाही तर राज्यभरात तीव्र आंदोलन उभारले जाईल,” असा इशाराही औताडे यांनी दिला.मोर्चादरम्यान संघटनेचे पदाधिकारी युवराज जगताप, डॉ. दादासाहेब आदिक, साहेबराव चोरमल, सागर गिऱ्हे, संतोष पटारे, संजय वमने, शिवाजीराव पटारे आदींसह कुरेशी समाजाचे महेबुब कुरेशी, अंजुम शेख, मुजफ्फर शेख, एड. समिन बागवान, जोयेफ जमादार यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असतानाही मोर्चेकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत घोषणाबाजी केली.शेवटी आंदोलनकर्त्यांनी आणलेली सुमारे ५० ते ५५ जर्सी व होलस्टीन गाई–गोऱ्हे थेट प्रांत कार्यालयाच्या दरवाज्याला बांधून “आता ही जनावरे आपणच सांभाळा” असा निर्वाणीचा पवित्रा घेतला. त्यानंतर प्रांताधिकारी सावंत यांनी नगरपालिकेच्या आरोग्य विभाग व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सर्व जनावरे ताब्यात घेण्याची तयारी दर्शवली. आरोग्य विभागाने ती सेंट्रल गोडाऊन येथील कोंडवाड्यात हलवून पुढील प्रक्रिया सुरू केली.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!