प्रांत कार्यालयावर शेतकऱ्यांचा आक्रोश;कर्जमुक्ती अन गोवंश हत्या बंदी कायद्यात सुधारणा करण्याची मागणी

श्रीरामपूर-नितीन शेळकेविदेशी जर्सी व होलस्टीन भाकड गाई–गोऱ्ह्यांच्या प्रश्नासह शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय बुधवारी (दि. २१ ऑगस्ट) श्रीरामपूरात पेटला.अहिल्यानगर जिल्हा शेतकरी संघटनेतर्फे प्रांत...

श्रीरामपूर-नितीन शेळके
विदेशी जर्सी व होलस्टीन भाकड गाई–गोऱ्ह्यांच्या प्रश्नासह शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय बुधवारी (दि. २१ ऑगस्ट) श्रीरामपूरात पेटला.अहिल्यानगर जिल्हा शेतकरी संघटनेतर्फे प्रांत कार्यालयावर धडक दिलेल्या आक्रोश मोर्चात “संपूर्ण कर्जमुक्ती करा, गोवंश हत्या बंदी कायद्यात सुधारणा करा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा ऍड. अजित काळे व जिल्हाध्यक्ष अनिलराव औताडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांना सविस्तर निवेदन दिले. यावेळी ऍड. अजित काळे म्हणाले की, गोवंश हत्या बंदी कायदा हा शेतकऱ्यांसाठी शाप ठरला आहे. हा कायदा केवळ धार्मिक आणि राजकीय हेतूंसाठी आणण्यात आला असून त्याचा परिणाम शेती आणि दूध व्यवसायावर गंभीर स्वरूपात झाला आहे. देशी गोवंशाचा सन्मान व संवर्धन करणे आवश्यक आहे; मात्र विदेशी भाकड जनावरांचा प्रश्न सोडवण्यासाठी कायद्यात सुधारणा करून त्यांना वगळणे अपरिहार्य आहे. “जर शासनाने वेळीच दखल घेतली नाही, तर हजारो शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त होईल आणि शेतकरी आत्महत्यांची मालिका थांबवणे कठीण जाईल,” असा इशारा त्यांनी दिला.
यात विदेशी जनावरे गोवंश हत्या बंदी कायद्याच्या कक्षेबाहेर काढावीत, देशी गोवंशावरच बंदी लागू रहावी, वन्यप्राणी संरक्षण कायदा रद्द करावा, भेसळयुक्त दुधावर बंदी आणावी, तसेच शेती साहित्याच्या वारंवार होणाऱ्या चोरीवर नियंत्रण ठेवावे अशा मागण्या करण्यात आल्या. “शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी आत्महत्येला प्रवृत्त होत असून ही परिस्थिती बदलली नाही तर राज्यभरात तीव्र आंदोलन उभारले जाईल,” असा इशाराही औताडे यांनी दिला.मोर्चादरम्यान संघटनेचे पदाधिकारी युवराज जगताप, डॉ. दादासाहेब आदिक, साहेबराव चोरमल, सागर गिऱ्हे, संतोष पटारे, संजय वमने, शिवाजीराव पटारे आदींसह कुरेशी समाजाचे महेबुब कुरेशी, अंजुम शेख, मुजफ्फर शेख, एड. समिन बागवान, जोयेफ जमादार यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असतानाही मोर्चेकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत घोषणाबाजी केली.शेवटी आंदोलनकर्त्यांनी आणलेली सुमारे ५० ते ५५ जर्सी व होलस्टीन गाई–गोऱ्हे थेट प्रांत कार्यालयाच्या दरवाज्याला बांधून “आता ही जनावरे आपणच सांभाळा” असा निर्वाणीचा पवित्रा घेतला. त्यानंतर प्रांताधिकारी सावंत यांनी नगरपालिकेच्या आरोग्य विभाग व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सर्व जनावरे ताब्यात घेण्याची तयारी दर्शवली. आरोग्य विभागाने ती सेंट्रल गोडाऊन येथील कोंडवाड्यात हलवून पुढील प्रक्रिया सुरू केली.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!