‘बोकांडी’ स्लोगन लिहलेल्या रावणाचे श्रीरामपूरात दहन;निवडणुकीपूर्वी राजकीय तर्कवितर्कांना सुरुवात

श्रीरामपूर-विजयादशमी निमित्त श्रीरामपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या ५१ फूट उंच भव्य रावण दहन कार्यक्रमाने यंदा राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडवून दिली....

श्रीरामपूर-
विजयादशमी निमित्त श्रीरामपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या ५१ फूट उंच भव्य रावण दहन कार्यक्रमाने यंदा राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडवून दिली. परिवर्तन समितीच्या वतीने या रावणावर लिहिण्यात आलेल्या “बोकांडीच” या स्लोगन ने सर्वांचे लक्ष वेधले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी हा स्लोगन शहरात जोरदार चर्चेचा विषय ठरत आहे.
या स्लोगनचे नेमके राजकीय संदर्भ काय आहेत, याबद्दल शहरात तर्कवितर्क लढवले जात आहेत. आगामी पालिका ,जिल्हापरिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर ‘परिवर्तन’चा संदेश देणाऱ्या या घोषणेने, स्थानिक राजकारणातील ‘रावणरूपी’ समस्यांवर नेमके बोट ठेवले असल्याची चर्चा  सुरू झाली आहे. रावण दहनाच्या निमित्ताने शहरातील विविध पक्षांचे नेते एकाच व्यासपीठावर आल्याने, राजकीय सौहार्दाचे चित्र देखील पहायला मिळाले.कामगार नेते नागेश सावंत, शिवसेनेचे उत्तर जिल्हाध्यक्ष सचिन बडदे आणि ‘आप’चे तिलक डुंगरवाल यांच्या वतीने या भव्य रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी शहरातील हजारो नागरिकांनी गर्दी केली होती. या रावण दहन कार्यक्रमास सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी स्त्री शक्तीचा सन्मान करत सौ. सविता सावंत, सौ. चारुशीला डुंगरवाल, सौ. भाग्यश्री बडदे,सौ. सुषमा पवार,सौ. रेणुका डेंगळे,सौ. प्रिया सावंत, सौ. नीता भालेराव,सौ.सोनाली रणपिसे,सौ. अर्चना डेंगळे, सौ. लता भोसले यांच्या हस्ते रावण दहन करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार हेमंत ओगले, माजी उपनगराध्यक्ष करण ससाने,भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, मा. उपनगराध्यक्ष संजय फंड, श्रीनिवास बिहाणी ,सिद्धार्थ मुरकुटे,आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, आशिष धनवटे, मनोज लबडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष लकी सेठी,राहुल मुथा,  गौतम उपाध्ये, भाजपाचे रुपेश हरकल, योगेश ओझा, संजय गांगड आदी उपस्थित होते. यंदाच्या वर्षी परिवर्तन समितीच्या वतीने रावणावर लिहिलेल्या “बोकांडीच”  हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निखिल पवार,अमोल सावंत, आर्टिस्ट महेश आघाडे,यासीन भाई सय्यद, रोहित भोसले,भगवान सोनवणे, जहीर सलीम शेख, राहुल रणपिसे,जयेश सावंत,शिवाजी सावंत,  रोहित भोसले,भरत डेंगळे, तेजस ऊडे, विकी गोरे, राहुल डुकरे, अजीम पठाण, अर्जुन मांजरे,आदींनी विशेष प्रयत्न केले. पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके तसेच शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चोख बंदोबस्तात शहरवासीयांच्या साक्षीने हा रावण दहन कार्यक्रम संपन्न झाला.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!