श्रीरामपूर-
विजयादशमी निमित्त श्रीरामपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या ५१ फूट उंच भव्य रावण दहन कार्यक्रमाने यंदा राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडवून दिली. परिवर्तन समितीच्या वतीने या रावणावर लिहिण्यात आलेल्या “बोकांडीच” या स्लोगन ने सर्वांचे लक्ष वेधले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी हा स्लोगन शहरात जोरदार चर्चेचा विषय ठरत आहे.
या स्लोगनचे नेमके राजकीय संदर्भ काय आहेत, याबद्दल शहरात तर्कवितर्क लढवले जात आहेत. आगामी पालिका ,जिल्हापरिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर ‘परिवर्तन’चा संदेश देणाऱ्या या घोषणेने, स्थानिक राजकारणातील ‘रावणरूपी’ समस्यांवर नेमके बोट ठेवले असल्याची चर्चा सुरू झाली आहे. रावण दहनाच्या निमित्ताने शहरातील विविध पक्षांचे नेते एकाच व्यासपीठावर आल्याने, राजकीय सौहार्दाचे चित्र देखील पहायला मिळाले.कामगार नेते नागेश सावंत, शिवसेनेचे उत्तर जिल्हाध्यक्ष सचिन बडदे आणि ‘आप’चे तिलक डुंगरवाल यांच्या वतीने या भव्य रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी शहरातील हजारो नागरिकांनी गर्दी केली होती. या रावण दहन कार्यक्रमास सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी स्त्री शक्तीचा सन्मान करत सौ. सविता सावंत, सौ. चारुशीला डुंगरवाल, सौ. भाग्यश्री बडदे,सौ. सुषमा पवार,सौ. रेणुका डेंगळे,सौ. प्रिया सावंत, सौ. नीता भालेराव,सौ.सोनाली रणपिसे,सौ. अर्चना डेंगळे, सौ. लता भोसले यांच्या हस्ते रावण दहन करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार हेमंत ओगले, माजी उपनगराध्यक्ष करण ससाने,भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, मा. उपनगराध्यक्ष संजय फंड, श्रीनिवास बिहाणी ,सिद्धार्थ मुरकुटे,आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, आशिष धनवटे, मनोज लबडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष लकी सेठी,राहुल मुथा, गौतम उपाध्ये, भाजपाचे रुपेश हरकल, योगेश ओझा, संजय गांगड आदी उपस्थित होते. यंदाच्या वर्षी परिवर्तन समितीच्या वतीने रावणावर लिहिलेल्या “बोकांडीच” हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निखिल पवार,अमोल सावंत, आर्टिस्ट महेश आघाडे,यासीन भाई सय्यद, रोहित भोसले,भगवान सोनवणे, जहीर सलीम शेख, राहुल रणपिसे,जयेश सावंत,शिवाजी सावंत, रोहित भोसले,भरत डेंगळे, तेजस ऊडे, विकी गोरे, राहुल डुकरे, अजीम पठाण, अर्जुन मांजरे,आदींनी विशेष प्रयत्न केले. पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके तसेच शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चोख बंदोबस्तात शहरवासीयांच्या साक्षीने हा रावण दहन कार्यक्रम संपन्न झाला.
