श्रीरामपुर-
श्रीरामपूर शहरातील नागरिकांनी यावेळी पहिल्यांदाच भाजपच्या ११ नगरसेवकांना विजयी केले.त्याबद्दल पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी समाधान व्यक्त करत श्रीरामपूर शहराच्या विकासासाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन दिले.शहराला पाण्याची समस्या भेडसावू देणार नाही.अतिक्रमणधारकांना न्याय देण्याबाबत भाजपच्या शिष्टमंडळाला ना.विखे यांनी आश्वस्त केले.
नगरपरिषेदेच्या पाणी पुरवठा योजनेच्या कामामुळे दैनंदिन पाणीपुरवठ्यात आलेली समस्या,कॅनॉल लाईनच्या अतिक्रमणधारकांना आलेल्या नोटीस यांसह विविध महत्वपूर्ण विषयांवर तोडगा काढावा म्हणून जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांची श्रीरामपूर शहरातील भाजप नेते व नगरसेवकांनी भेट घेतली.याबाबत सविस्तर माहिती अशी की, श्रीरामपूर नगरपरिषदेत भाजप पक्षाचे ११ नगरसेवक विजयी झाल्यानंतर शहरातील विकासकामांना गती मिळावी, दररोज होणार पाणीपुरवठा सुरळीत राहावा, शहरातील कॅनोल भूमिगत करून त्यावर अतिक्रमणधारकांना गाळे मिळावे यांसह विविध मागण्यांसाठी भाजपच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री विखे पाटील यांची नुकतीच भेट घेतली. यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, उपाध्यक्ष दीपक पटारे, माजी नगराध्यक्ष संजय फंड, शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड, केतन खोरे, रवी पाटील, नगरसेवक दीपक चव्हाण, श्रीनिवास बिहाणी, अर्जुन दाभाडे, संजय गांगड, आशिष धनवटे, शशांक रासकर, संजय छल्लारे, सिद्धार्थ फंड, मनोज लबडे, बंडूकुमार शिंदे संदीप चव्हाण, मारुती बिंगले, विजय पवार, अमोल शेटे, राजू यादव आदींसह भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
