श्रीरामपूर-
आपल्याला भेटण्याची इच्छा घेऊन मुंबईत आलेला कोणताही शिवसैनिक न भेटता परत गेलाच नाही पाहिजे हाच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा शिरस्ता असून तो त्यांच्या मनाचा मोठेपणा असल्याचे प्रांजळ मत शिवसेना नेते तथा राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांनी व्यक्त केले.मुंबई येथील भेटीत श्रीरामपूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीबाबत चर्चा झाली असून ती श्रीरामपूर शहराच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्वाची ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
श्रीरामपुर येथून मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी व काही महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय श्रीराम संघांचे अध्यक्ष सागर बेग व शिवसैनिक गेले होते. त्यांना दिवसभर कामाच्या व्यापातून वेळ देता न आल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यरात्री तीन वाजता स्वतःच्या राहत्या घरी बोलावून घेतले आणि भेट देत दिलखुलास चर्चा केली. जवळपास एक तास सागर बेग यांच्याशी त्यांनी श्रीरामपूर व जिल्ह्यातील महत्वाच्या विषयांवर सविस्तरपणे चर्चा केली.चर्चे दरम्यान त्यांनी बेग यांना काही विषयांवर मार्गदर्शन देखील केले.श्रीरामपूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीबाबत झालेली ही भेट श्रीरामपूर शहराच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्वाची ठरणार आहे.एकनाथ शिंदे हे आज महाराष्ट्रातील प्रत्येक लाडक्या बहिनीचे भाऊ तर गरजू रुग्णांना मदतीचा हात देणारे नाथ झाले आहेत. तेच शिंदे आपल्या सर्वसामान्य शिवसैनिकाला ही विसरलेले नाहीत.दिवसभर मंत्रालयात राज्याची धुरा यशस्वीपणे सांभाळून मध्यरात्री पर्यंत शिवसैनिकांनाही वेळ देणारे ते कुशल नेतृत्व आहे.मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी घेतलेले अनेक धडाकेबाज निर्णय आजही महाराष्ट्राला दिशादर्शक ठरत आहेत.लाडकी बहीण योजना ही त्यांचीच कल्पना.एकनाथ शिंदे यांनी याच योजनेच्या जोरावर आपल्या विरोधकांचा सुफडा साफ केला असल्याचेही सागर बेग यांनी स्पष्ट केले.
