श्रीरामपूर नगरपालिकेच्या निवडणुकीवर चर्चा;उपमुख्यमंत्री शिंदे यांची बेग यांनी घेतली भेट

श्रीरामपूर-आपल्याला भेटण्याची इच्छा घेऊन मुंबईत आलेला कोणताही शिवसैनिक न भेटता परत गेलाच नाही पाहिजे हाच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा शिरस्ता असून...

श्रीरामपूर-
आपल्याला भेटण्याची इच्छा घेऊन मुंबईत आलेला कोणताही शिवसैनिक न भेटता परत गेलाच नाही पाहिजे हाच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा शिरस्ता असून तो त्यांच्या मनाचा मोठेपणा असल्याचे प्रांजळ मत शिवसेना नेते तथा राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांनी व्यक्त केले.मुंबई येथील भेटीत श्रीरामपूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीबाबत चर्चा झाली असून ती श्रीरामपूर शहराच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्वाची ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
श्रीरामपुर येथून मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी व काही महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय श्रीराम संघांचे अध्यक्ष सागर बेग व शिवसैनिक गेले होते. त्यांना दिवसभर कामाच्या व्यापातून वेळ देता न आल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यरात्री तीन वाजता स्वतःच्या राहत्या घरी बोलावून घेतले आणि भेट देत दिलखुलास चर्चा केली. जवळपास एक तास सागर बेग यांच्याशी त्यांनी श्रीरामपूर व जिल्ह्यातील महत्वाच्या विषयांवर सविस्तरपणे चर्चा केली.चर्चे दरम्यान त्यांनी बेग यांना काही विषयांवर मार्गदर्शन देखील केले.श्रीरामपूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीबाबत झालेली ही भेट श्रीरामपूर शहराच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्वाची ठरणार आहे.एकनाथ शिंदे हे आज महाराष्ट्रातील प्रत्येक लाडक्या बहिनीचे भाऊ तर गरजू रुग्णांना मदतीचा हात देणारे नाथ झाले आहेत. तेच शिंदे आपल्या सर्वसामान्य शिवसैनिकाला ही विसरलेले नाहीत.दिवसभर मंत्रालयात राज्याची धुरा यशस्वीपणे सांभाळून मध्यरात्री पर्यंत शिवसैनिकांनाही वेळ देणारे ते कुशल नेतृत्व आहे.मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी घेतलेले अनेक धडाकेबाज निर्णय आजही महाराष्ट्राला दिशादर्शक ठरत आहेत.लाडकी बहीण योजना ही त्यांचीच कल्पना.एकनाथ शिंदे यांनी याच योजनेच्या जोरावर आपल्या विरोधकांचा सुफडा साफ केला असल्याचेही सागर बेग यांनी स्पष्ट केले.

मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना नेते सागर बेग यांनी भेट घेतली.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!