पाणी पुरवठा योजनेचे काम वेळेत पूर्ण करा-पालकमंत्री विखे पाटील यांच्या सूचना;श्रीरामपूर शहराच्या १७८ कोटी रुपयांच्या पाणी योजनेच्या कामाची पाहणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहराची गरज लक्षात घेवून महायुती सरकराने वाढीव पाणी पुरवठा योजनेला मंजूरी दिली आहे. १७८ कोटी रुपयांच्या निधीतून कार्यान्वित होणाऱ्या पाणी...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर शहराची गरज लक्षात घेवून महायुती सरकराने वाढीव पाणी पुरवठा योजनेला मंजूरी दिली आहे. १७८ कोटी रुपयांच्या निधीतून कार्यान्वित होणाऱ्या पाणी पुरवठा योजनेचे काम निर्धारीत वेळेत पूर्ण होण्याच्या दृष्टीने नियोजन करा आशा सूचना जलसंपदा तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.
श्रीरामपूर शहरातील विविध प्रभागां मधील विकास कामांचा शुभारंभ तसेच लोकार्पण सोहळा मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.पालिकेच्या वतीने विकसित करण्यात येत असलेल्या शहर वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या कामाची पाहाणी त्यांनी अधिकारी व पदाधिकारी यांच्या समवेत केली.महायुती सरकारने या योजनेच्या कामाला केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून १७८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.२०५१ सालची  लोकसंख्या गृहीत  २६.३६ दक्ष लक्ष लिटर पाणी प्रतिदीन  लागण्याची शक्यता गृहीत धरून योजनेचा  आराखडा तयार करण्यात आला आहे.सद्य परिस्थितीत जल शुध्दीकरण केंद्राचे आर सी सी डिझाइन प्रमाणे फिल्टर बेडचे खोदकाम पूर्ण झाले असून दगडी सोलिंग व क्राॅकींटचे काम प्रगती पथावर असल्याची माहीती मुख्याधिकारी मच्छीद्र घोलप  यांनी सांगितले.पाणी योजनेतील नवीन उंच जलकुंभ काम जुन्या टाकीचे बांधकाम पाडल्यानंतर हाती घेण्यात येणार असून,वितरण व्यवस्थैसाठी ५९ कि.मी.पाइप लाइनच्या कामापैकी १७ कि.मी.पूर्ण काम पूर्ण झाले असल्याचे या पाहाणी दरम्यान सांगण्यात आले.पाणी योजने करीता तलावाचे सर्वेक्षण पूर्ण करून बोअर कोअर चाचणी करण्यात आली आहे.तलावाचे खोलीकरण हे निर्धारीत वेळेत पूर्ण करून आर. सी.सी.काम करण्यात येणार आहे.तलावात आर सी सी काम पूर्ण झाल्यानंतर तळातील मातीचा थर प्लस्टिक शीट वाळूचा थर इत्यादी काम पूर्ण करण्यासाठी दोन महीन्याच्या कालावधी लागणार आहे.योजनेतील सर्व काम कोणत्याही त्रृटी राहाणार नाहीत अशा पध्दतीने पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री विखे पाटील यांनी दिले.वाढीव पाणी पुरवठा योजना शहराच्या भविष्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण असल्याने सामाजिक भावना लक्षात घेवून योजनेचे काम दिलेल्या कालावधीत पूर्ण करण्याची काळजी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी घेण्याचे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले.मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत शहरातील एकूण पाच प्रभागात भूमीपूजन आणि उद्घाटनाचे कार्यक्रम संपन्न झाले.ठिकठिकाणी नागरीकांशी संवाद साधून मंत्री विखे पाटील यांनी नागरीकांच्या समस्या तसेच विकास प्रक्रीयेबाबत असलेल्या सूचना जाणून घेतल्या.भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर,मा सभापती दीपक पटारे, शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड, माजी नगराध्यक्ष संजय फंड, केतन खोरे, नानासाहेब पवार, नानासाहेब शिंदे, शरदराव नवले, प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित होते.

श्रीरामपूर शहरातील विविध प्रभागांमधील विकास कामांचा शुभारंभ तसेच लोकार्पण सोहळा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला

चौकट
‘शहराच्या भविष्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण योजना’
योजनेतील सर्व काम कोणत्याही त्रृटी राहाणार नाहीत अशा पध्दतीने पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री विखे पाटील यांनी दिले आहेत.वाढीव पाणी पुरवठा योजना शहराच्या भविष्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण असल्याने सामाजिक भावना लक्षात घेवून योजनेचे काम दिलेल्या कालावधीत पूर्ण करण्याची काळजी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी घेण्याचे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!