श्रीरामपूर-
तालुक्यातील मुठेवाडगाव येथील एन बी कॅनोल पासुन ते मुठेवाडगांव गावापर्यंतच्या मुख्य चारीचे रुंदिकरण व खोदकामास राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉ.राधाकृष्ण विखे पाटिल यांच्या विशेष सहकार्यने कामास प्रारंभ झाला आहे.परिसरातील शेतकऱ्यांना आता पूर्ण दाबाने पाणी मिळणार असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
या कामासाठी भाजपचे तालुका सरचिटणीस डॉ शंकरराव मुठे यांनी नामदार विखे पाटील साहेब यांच्या कडे चारीच्या कामासाठी मागणी केली होती की मुठेवाडगांव व भोकर (पटारे फाटा) या दोन गांवसाठी एकच चारी आहे व ती अरुंद आहे त्यामुळे मार्तन्ड फाटा येथे २० ते २५ केसेस पर्यन्त पाणी मिळत होते त्यामुळे गांवतील लोकाना शेतीसाठी पुर्णदाबाने पाणी मिळत नव्हते. त्यामुळे गांवतील टेलच्या शेतकऱ्यांचे भरणे कायम राहत होते.आता चारिचे काम आहे त्यापेक्षा दोन फुट खोल व रुंद करण्यात आल्याने पुर्ण दबाने म्हणजे ४० क्यूसेस ने पाणी मिळणार आहे. या कामची पाहणी डॉ.शंकरराव मुठे,कॅनॉल निरीक्षक धनवटे भाऊसाहेब, वारकरी संप्रदायचे तालुका अध्यक्ष भिकचंद मुठे,स्वामी समर्थ केंद्राचे दिलीप मुठे,रावण मुठे,जालिंदर मुठे,मल्हारी मुठे सह अनेक शेतकरी उपस्थित होते.चारीचे काम केल्याबद्दल नामदार डॉ.राधाकृष्ण विखे पाटील साहेब, पाटबंधारेचे कल्हापुरे,धनवटे व डॉ शंकरराव मुठे यांचे मुठेवाडगाव व भोकर येथील शेतकरी यांनी आभार मानले.
