जिल्हा बँकांनी बेकायदेशीर वसुली केल्यास संघर्ष करू-शेतकरी संघटनेचा इशारा

श्रीरामपूर-अशोक कारखाना कार्यस्थळावर आज दि.५ रोजी सकाळी जिल्हा बँकेचे श्रीरामपूर तालुका विस्तार अधिकारी यांच्यासह तालुक्यातील बँकेचे वसुली अधिकारी व सेवा सहकारी...

श्रीरामपूर-
अशोक कारखाना कार्यस्थळावर आज दि.५ रोजी सकाळी जिल्हा बँकेचे श्रीरामपूर तालुका विस्तार अधिकारी यांच्यासह तालुक्यातील बँकेचे वसुली अधिकारी व सेवा सहकारी सोसायटी यांचे सचिव थकबाकी असलेल्या सेवा सोसायटीतील शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून वसुली करण्यासाठी आले होते.परंतु शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या वसुली अधिकाऱ्यांना कारखान्यावरून माघारी पाठवून बेकायदेशीर वसुलीचा हा प्रयत्न हाणून पडण्यात आला असे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी सांगितले.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले की,
कारखान्यावर जिल्हा बँकेचे अधिकारी व कर्मचारी ऊस बिलातून कर्ज वसुलीसाठी आले असल्याची माहिती शेतकरी संघटनेस मिळाल्यानंतर जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, तालुका अध्यक्ष युवराज जगताप, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष दत्तात्रेय लिपटे, साहेबराव चोरमल, सतीश नाईक, सर्जेराव देवकर, कडू पवार आदी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कारखान्यावर धाव घेतली. त्यावेळी कारखान्यावर कारखान्याचे अध्यक्ष,उपाध्यक्ष व कार्यकारी संचालक कुणीही उपस्थित नव्हते. कारखान्याचे चीफ अकाउंटंट श्री.कुलकर्णी व तालुका विस्तार अधिकारी शिवाजी पवार यांची कारखाना स्थळावर यांची भेट घेऊन त्यांना वसुली बाबत विचारणा केली असता वसुलीबाबत आपणास सहकार विभागाचे कुठले आदेश आहेत का? असा प्रश्न शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी उपस्थित केला. सदर प्रश्नस उत्तर देताना जबाबदार अधिकाऱ्यांनी आम्ही फक्त थकबाकीची माहिती घेण्यासाठी कारखान्यावर आलो आहोत,आम्ही ऊस बिलातून वसुली करणार नाही, असे सांगितले.वास्तविक तालुक्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांची सर्व माहिती जिल्हा बँकेकडे अद्यावत असताना अशाप्रकारे बेकायदेशीर वसुली करून शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचा प्रकार जिल्हा बँकेच्या संचालकांनी सुरू केला होता. सदर प्रकार शेतकरी संघटनेने वसुली अधिकाऱ्यांना कारखान्यावरून माघारी पाठवून हाणून पाडला आहे. 9 ऑक्टोबर 2025 रोजी शासन निर्णयाद्वारे महाराष्ट्र सरकारने शेतीशी निगडित कर्जाच्या वसुली स्थगिती दिलेले असून याबाबत सहकार खात्याने वेळोवेळी वृत्तपत्रातून प्रसिद्ध केलेले आहे. तसेच शेतकरी संघटनेने ऊस दराच्या बैठकीत रिजनल डायरेक्टर व जिल्हाधिकारी यांच्या ही सदर बाब निदर्शनास आणून दिली होती. अप्पर जिल्हाधिकारी श्री.हिंगे यांना आठ दिवसापूर्वी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन सदर शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होणे कामी निवेदन दिले होते.शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष युवराज जगताप यांच्या शिष्टमंडळानेही अशोक कारखान्याच्या बेकायदेशीर होत असलेल्या ऊस बिलातील वसुलीस तीव्र विरोध केलेला आहे.तसेच नव्याने सुरू झालेला पंचगंगा कारखाना पंधरा दिवसाच्या आत विनाविलंब पेमेंट करत असून जिल्ह्यातील एकाही कारखान्याने गाळप हंगाम सुरू होऊन एक महिना उलटून गेला तरी अद्याप शेतकऱ्यांना ऊस पेमेंट दिलेले नाही,याबाबतही शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!