काँग्रेसकडून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारी;मा.खा.विखे यांची टीका;भाजप-राष्ट्रवादीच्या उमेदवारांची प्रचार सांगता सभा

श्रीरामपूर-काँग्रेसने दहशतवाद तसेच पोस्को आणि मोक्का सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांना निवडणुकीत उमेदवारी दिली आहे, ही मोठी शोकांतिका आहे.अशा गुन्हेगारी...

श्रीरामपूर-
काँग्रेसने दहशतवाद तसेच पोस्को आणि मोक्का सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांना निवडणुकीत उमेदवारी दिली आहे, ही मोठी शोकांतिका आहे.अशा गुन्हेगारी प्रवृतीच्या हाती पुन्हा श्रीरामपूर द्यायचे का, याचा विचार श्रीरामपुरकरांना करावा लागणार असून ही निवडणूक श्रीरामपूरच्या अस्मितेची निवडणूक आहे,असे प्रतिपादन मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी केले.
श्रीरामपुर शहरातील शिवतीर्थ परिसरात आयोजित करण्यात आलेल्या भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवारांच्या प्रचार सांगता सभेत उपस्थितांना मार्गदर्शन करताना विखे पाटील बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्रीनिवास बिहाणी,राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अविनाश आदिक,जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, मा. सभापती दीपक पटारे, अनुराधा आदिक,संजय फंड,अशोक कानडे,इंद्रनाथ थोरात, नानासाहेब शिंदे यांच्यासह नगरसेवकपदाचे सर्व उमेदवार उपस्थित होते.
मा. खा. डॉ. विखे पुढे म्हणाले की, नगरपालिका निवडणूकित महायुती तोडून खुर्चीसाठी आणि काँग्रेसला मदत व्हावी म्हणून काही अपशकुनी निवडणूक रिंगणात उतरले आहेत.40 वर्षे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे निमित्त करून त्याचे भांडवल करून काँग्रेसच्या नेत्यांनी स्वतः चा स्वार्थ साधला. आता पुतळा उभा राहिला. त्यामुळे आपला नाकर्तेपणा झाकण्यासाठी ते दुसऱ्या वर आरोप करत आहेत.श्रीरामपूर जिल्हा करण्याच्या प्रश्नाचे ही असेच भांडवल करून त्यास विखे पाटील यांचा विरोध आहे असे भासवले जाते.15 वर्षांपासून हा रेडिओ लावून रस्त्यावर बसण्याचे काम केले जात आहे. आता नवीन स्वाभिमानी श्रीरामपूर अशी मोहीम शोधून काढली. श्रीरामपूरकर स्वाभिमानीच आहे परंतु तुमचे काय,तुम्ही तर श्रीगोंदयावरून आमदार आणले आहेत.
बेरोजगारांच्या हाताला काम आणि माताभगिनींना गुन्हेगारांपासून सुरक्षा मिळवून देणारी निवडणूक आहे.जातीपातीचे आणि हिंदू-मुस्लिम या मुद्द्यांचे भांडवल करून 40 वर्षे एका कुटुंबाने सत्ता भोगली. आता श्रीरामपूर च्या पुढील 25 वर्षांच्या भविष्यासाठी व विकासासाठी निर्णय घेण्याची वेळ आली आहे.जो निर्णय संगमनेर मध्ये घेतला गेला तो इथे घेण्याची गरज आहे.त्यामुळे आता ही शेवटची संधी अडून चूक करू नका,असे आवाहन मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी शेवटी केले.अविनाश आदिक म्हणाले की,या निवडणुकीत मतविभागणी टाळण्यासाठी आपण एकत्रितपणे प्रयत्न केला. त्यासाठी आम्ही दोन पावले मागे आलो परंतु काही जणांनी अपशकुन केला.ज्या नीच प्रवृत्तीच्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला त्यांनी अद्यापपर्यंत माफी देखील मागितली नाही.त्यामुळे त्यांना निवडणूकित धडा शिकवावाच लागेल.विखे पाटलांमुळे संगमनेरच्या साहेबांनी सुद्धा धसका घेऊन काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवणे टाळले,ही गंभीर घटना आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अतिक्रमण कारवाईत विस्थापित झालेल्यांचे 100 टक्के पुनर्वसन करण्याचा शब्द दिला असून तोपर्यंत कुणावरही कारवाई न करण्याचे आश्वासन देखील दिले असल्याचे आदिक यांनी सांगितले. यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्रीनिवास बिहाणी,दीपक पटारे, संजय फंड,अशोक कानडे यांचीही भाषणे झाली.यावेळी शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख प्रदीप वाघ  यांच्या सह अनेकांनी भाजपात जाहीर प्रवेश केला. तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सुभाष त्रिभुवन यांनीही आपल्या पक्षाचा युतीला पाठिंबा जाहीर केला.

24 तास शुद्ध पाणी अन 100 दिवसांत खड्डेमुक्त शहर
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याने 178 कोटींची पाणी पुरवठा योजना लवकरच कार्यान्वित करून श्रीरामपुर शहराला 24 तास शुद्ध पाणी पुरवठा करून 100 दिवसांच्या आत शहर खड्डेमुक्त करून दाखवू असे आश्वासन नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्रीनिवास बिहाणी यांनी दिले.

श्रीरामपुर येथील भाजप राष्ट्रवादी च्या उमेदवारांच्या प्रचार सांगता सभेत मार्गदर्शन करताना मा. खा. डॉ. सुजय विखे पाटील. (छाया-अमोल कदम)
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!