पालकमंत्री विखे यांनी श्रीरामपूरचा बिहार केला-चित्ते यांचा घणाघाती आरोप;पोलिसांच्या माध्यमातून दहशतीचा वापर

श्रीरामपूर-जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्रीरामपूरचा बिहार करण्याचे काम चालवले आहे.शिवसेनेच्या उमेदवारांना पोलिस प्रशासनाच्या माध्यमातून धमक्या दिल्या जात आहेत.त्यांच्यावर दबाव...

श्रीरामपूर-
जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्रीरामपूरचा बिहार करण्याचे काम चालवले आहे.शिवसेनेच्या उमेदवारांना पोलिस प्रशासनाच्या माध्यमातून धमक्या दिल्या जात आहेत.त्यांच्यावर दबाव टाकला जात आहे.माझ्याबरोबर असणाऱ्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात असून नगरपालिका निवडणूकित विखे पाटील यांनी प्रचंड प्रमाणात दहशतीचा वापर सुरू केला असल्याचा घणाघाती आरोप शिवसेना शिंदे गटाच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रकाश चित्ते यांनी केला आहे.
श्रीरामपूर येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश चित्ते बोलत होते. चित्ते पुढे म्हणाले की,शहरातील गुन्हेगारी विखे पाटील यांच्यामुळेच वाढली. त्यांनीच गुंडांना पोसले.पालकमंत्री तेच आहेत.आताही निवडणूक काळात सुनील मुथा व शामलिंग शिंदे यांच्यावर त्यांनी गुन्हे दाखल करायला लावले.तसेच सेनेच्या प्रभाग 17 मधील उमेदवारालाही पोलिसांच्या दडपणाखाली माघार घेण्यास भाग पाडले.या सर्व जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकांच्या करामती असल्याचा आरोपही चित्ते यांनी केला.ते पुढे म्हणाले की,श्रीरामपूर जिल्हा विखे यांनीच होऊ दिला नाही.शहरातील 2 हजार लोकांचा प्रपंच अतिक्रमण कारवाईच्या नावाखाली विखे पा. यांनी उध्वस्त केला.ते फक्त व्यक्ती द्वेष करतात.मी त्यांच्यासाठी घातक आहे.समाजासाठी नाही.या निवडणुकीत भाजपचे पॅनल सुद्धा होऊ शकत नव्हते. त्यांचे पॅनल हे आमच्या संघटनेचे कर्तृत्व आहे. शहरातली भाजप ही खरी भाजप नसून ती विखे यांची काँग्रेस आहे.


स्व.जयंत ससाणे यांच्याबरोबर असलेलेच आज भाजपकडून उमेदवार म्हणून उभे आहेत.ही सर्व तीच जुनी रेबन गॅंग आहे.त्यांना तेव्हाही शहरातील जनतेचा विरोध होता व तो आताही आहे.त्यामुळे आताची भाजप ही काँग्रेसचीच बी टीम असल्याचेही चित्ते यांनी म्हटले.विखे यांना काँग्रेसचे उमेदवार करण ससाणे यांना नगराध्यक्ष आणि राष्ट्रवादीच्या अनुराधा आदिक यांना उपनगराध्यक्ष करायचे आहे.त्यांना भाजपचे काहीही घेणेदेणे नाही.त्यांना आपली विखे संघटना महत्वाची आहे.त्यांची संघटना ही बांडगुळांची संघटना आहे.ती ठेकेदारी करणारांची टोळी असल्याचे चित्ते म्हणाले.मी 40 वर्षे भाजपचे काम करत आलो. परंतु भाजपने माझ्या कामाचे मूल्यमापन केले नाही.ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आणि मला न्याय दिला.निवडणूक प्रचार संदर्भात दि.24 रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शहरात रॅली व छोटी सभा होणार असल्याचेही चित्ते यांनी सांगितले.

आदिकांना तेव्हा मी कसा चाललो?
राष्ट्रवादीच्या अविनाश आदिक यांनाही मी श्रीरामपूर करता घातक वाटत असेल तर मग मागील निवडणूकीच्या वेळी आपल्या बहिणीसाठी अनुराधा आदिक यांच्यासाठी माझ्याकडे पाठिंबा त्यांनी का मागितला?त्यावेळी मी त्यांना का चाललो?असे प्रश्नही चित्ते यांनी उपस्थित केले.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!