नगराध्यक्षपदासाठी ९ तर नगरसेवकपदासाठी १४८ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात;२७ उमेदवारांनी घेतली माघार

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी दाखल २७४ उमेदवारी अर्जांपैकी २७ उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या दिवशी माघार घेतली आहे. आता नगराध्यक्षपदासाठी ९...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी दाखल २७४ उमेदवारी अर्जांपैकी २७ उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या दिवशी माघार घेतली आहे. आता नगराध्यक्षपदासाठी ९ तर नगरसेवकपदासाठी १४८ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात कायम राहिले आहेत. नगराध्यक्षपदाच्या लढतीत काँग्रेस, भाजप, शिवसेना (शिंदे) व शिवसेना(उबाठा) या  पक्षांचे उमेदवार आमनेसामने असून त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.
श्रीरामपूर नगरपालिका निवडणूकिसाठी आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत होती. नगरसेवकपदासाठी काँग्रेस व भाजप यांनी प्रत्येकी ३४, शिवसेना (शिंदे गट) ने ३२, तर शिवसेना (ठाकरे गट) ने ११ जागांवर उमेदवार उभे केले आहेत.नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या एकूण १० उमेदवारांपैकी अपक्ष उमेदवार निलोफर पटेल यांनी माघार घेतल्याने आता ९ उमेदवार नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीच्या रिंगणात राहिले आहेत. यामध्ये वसंत कोल्हे, प्रकाश चित्ते (शिवसेना-शिंदे गट), अशोक थोरे (शिवसेना-ठाकरे गट), श्रीनिवास बिहाणी (भाजप), निलेश भालेराव (अपक्ष), जोएफ शेख (समाजवादी), आकाश शेंडे (बीएसपी), करण ससाणे (काँग्रेस) व चरण त्रिभुवन (वंचित बहुजन आघाडी) यांचा समावेश आहे.नगरसेवक पदासाठी विविध प्रभागांतून २७ माघारी नोंदवण्यात आल्या असून माघारीनंतर १४८ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत.दरम्यान आता श्रीरामपूर नगरपालिका निवडणूकीचे चित्र जवळपास स्पष्ट झाले असून उमेदवारांना प्रचारासाठी उणेपूरे 10 ते 12 दिवस मिळणार आहेत. त्यामुळे नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदासाठी निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करावी लागणार आहे.

प्रभागनिहाय माघारी पुढीलप्रमाणे—
१-अ : सोनवणे जनार्धन
२-ब : पठाण जावेद जब्बार
३-अ : ढोकणे सुनीता रामदास
३-ब : शिंदे बाळासाहेब अर्जुन, यादव विशाल बिपीनचंद्र
४-अ : खान शेहरोज मुस्ताफा
४-ब : पंडित रोमा रवींद्र
६-अ : शाह अफरोज फिरोज
6-ब : नर्गिस मुक्तार मन्यार
८-अ : शाह ताहेरा मुक्तार
९-ब : अंभोरे भारती
१०-अ : पोटे ऋतुजा सुभाष, रोकडे पेरुबाई बबन
१०-ब : जाधव उकास आण्णासाहेब, चव्हाण देविदास काशिनाथ, खिलारी कविता रवींद्र, कदम सोमनाथ फक्कड
१२-अ : नंदूबाई कडू शेलार
१२-ब : छल्लारे शिवानी संजय
१३-ब : माटा विवेक पारसकुमार
१४-अ : साळवे संजू नाना
१४-ब : माटा दीपाली पारसकुमार
१५-ब : खोसरे वनिता बाबासाहेब
१६-अ : डोखे युवराज सुरेश
१६-ब : जाधव स्वप्नील संजय
१७-ब : कुऱ्हे प्रमोद खंडू

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!