चेंडूफळ येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत ऊस जळून खाक;शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान

श्रीरामपूर-श्रीरामपूर-वैजापूर तालुक्याच्या सीमेवरील चेंडूफळ (ता. वैजापूर) गावात शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस पिकाचे तारांच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागून प्रचंड मोठे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर-वैजापूर तालुक्याच्या सीमेवरील चेंडूफळ (ता. वैजापूर) गावात शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस पिकाचे  तारांच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागून प्रचंड मोठे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.या शेतकऱ्यांनी महावितरणकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे.भारत भागवत पवार, अभय लक्ष्मीकांत पवार, राजेंद्र विजय पवार अशी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नावे आहेत.या शेतकऱ्यांच्या शेतात महावितरणचे वीजवाहक पोल असून त्यावरील तारांच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागून ऊस पिकाचे प्रचंड मोठे नुकसान झाले असून संबंधित शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालय,वैजापूर यांच्याकडे याबाबत वेळोवेळी तक्रार देखील केली होती असे या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.महावितरणकडून या तक्रारींची दखल घेण्यात आली नसल्याचाही या शेतकऱ्यांनी आरोप केला आहे. त्यामुळे ऊस जळीताची ही घटना घडल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.दरम्यान अगोदरच अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झालेले असतानाच त्यात या ऊस पिकाच्या जळीताच्या घटनेने या शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांनी मदतीसाठी अग्निशामक वाहनासही बोलवले होते परंतु वैजापूर तालुक्यापासून 45 किलोमीटर अंतर असल्यामुळे ती मदतही वेळेत होऊ शकली नाही.ऊस पिकाचे जळीत होऊन झालेल्या नुकसानीला महावीतरणाचा भोंगळ कारभार जबाबदार असून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!