चेंडूफळ येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत ऊस जळून खाक;शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान

श्रीरामपूर-श्रीरामपूर-वैजापूर तालुक्याच्या सीमेवरील चेंडूफळ (ता. वैजापूर) गावात शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस पिकाचे तारांच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागून प्रचंड मोठे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर-वैजापूर तालुक्याच्या सीमेवरील चेंडूफळ (ता. वैजापूर) गावात शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस पिकाचे  तारांच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागून प्रचंड मोठे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.या शेतकऱ्यांनी महावितरणकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे.भारत भागवत पवार, अभय लक्ष्मीकांत पवार, राजेंद्र विजय पवार अशी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नावे आहेत.या शेतकऱ्यांच्या शेतात महावितरणचे वीजवाहक पोल असून त्यावरील तारांच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागून ऊस पिकाचे प्रचंड मोठे नुकसान झाले असून संबंधित शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालय,वैजापूर यांच्याकडे याबाबत वेळोवेळी तक्रार देखील केली होती असे या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.महावितरणकडून या तक्रारींची दखल घेण्यात आली नसल्याचाही या शेतकऱ्यांनी आरोप केला आहे. त्यामुळे ऊस जळीताची ही घटना घडल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.दरम्यान अगोदरच अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झालेले असतानाच त्यात या ऊस पिकाच्या जळीताच्या घटनेने या शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांनी मदतीसाठी अग्निशामक वाहनासही बोलवले होते परंतु वैजापूर तालुक्यापासून 45 किलोमीटर अंतर असल्यामुळे ती मदतही वेळेत होऊ शकली नाही.ऊस पिकाचे जळीत होऊन झालेल्या नुकसानीला महावीतरणाचा भोंगळ कारभार जबाबदार असून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!