नगर-मनमाड वरील जड वाहतूक पर्यायी मार्गाने;पोलीस अधीक्षक यांचे आदेश

श्रीरामपूर-जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहिल्यानगर-मनमाड महामार्गावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला जडवाहनांची वाहतूक त्वरित वळविण्याचे आदेश दिले...

श्रीरामपूर-
जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहिल्यानगर-मनमाड महामार्गावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला जडवाहनांची वाहतूक त्वरित वळविण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी या संदर्भातआदेश जारी केले आहेत. त्यानुसार आज दि. १२ सप्टेंबर पासून जडवाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.
नगर-मनमाड महामार्ग हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे.देशभरातून लाखो भाविक या रस्त्याचा वापर करतात. मात्र रस्त्यावरील खड्डे, दुरावस्था, वारंवार होणारे अपघात आणि वाढत्या जडवाहनांमुळे प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.गेल्या काही दिवसांत या मार्गावर झालेल्या अपघातांमध्ये अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत स्वतः हस्तक्षेप करून संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश दिले आहेत की, रस्त्याचे काम वेगाने पूर्ण व्हावे, तसेच काम पूर्ण होईपर्यंत जड वाहतूक या मार्गावरून बंद करून वळविण्यात यावी.आज दि. १२ सप्टेंबर २०२५ रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी वाहतूक वळविण्या बाबतचे अधिकृत पत्रक प्रसिद्ध केले आहे.त्यानुसार ही वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.तसेच येत्या काही दिवसांत नगर-मनमाड मार्गाचे दुरुस्तीचे कामही जलदगतीने पूर्ण केले जाणार आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!