श्रीरामपूर-
मशीदी व मदरशांवर बसवलेल्या अनधिकृत भोंगे व लाऊडस्पीकरद्वारे वाढत असलेल्या ध्वनीप्रदूषणामुळे मुंबई उच्च न्यायालयाने जानेवारी २०२५ मध्ये दिलेल्या निर्णयाचे उल्लंघन होत आहे. पोलीस प्रशासनाने त्या निर्णयाचे काटेकोरपणे अनुपालन करावे तसेच अनधिकृत भोंग्यांपासून होणाऱ्या ध्वनी प्रदूषणा विरुद्ध त्वरित कारवाई करावी या मागणीचे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी यांना राष्ट्रीय श्रीराम संघ अध्यक्ष व शिवसेना शिंदे गटाचे नेते सागर बेग यांनी दिले.
निवेदनात पुढे म्हटले आहे की,मुंबई उच्च न्यायालयाच्या क्रिमिनल रिट याचिका क्र. ४७२९/२०२१ यावर न्यायाल्याने दिलेल्या निर्णयानुसार संपूर्ण राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना,महानगरांतील संबंधित झोनच्या उपायुक्तांना आणि ग्रामीण पोलीस अधीक्षकांना ध्वनी प्रदूषण नियम 2000 च्या उल्लंघना संदर्भात सुनावणी घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.मशिद व मदरशांवर अनधिकृत बसवलेल्या लाऊड स्पीकरद्वारे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होत आहे.त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने निश्चित केलेल्या ४५ डेसिबलच्या मर्यादेचे उल्लंघन होत आहे.ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारी प्राप्त झाल्यास त्या महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम 38 व 136 अंतर्गत कारवाईसाठी तसेच सक्षम न्यायालयात तक्रार दाखल करण्यासाठी ध्वनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पाठवाव्यात.पोलीस यंत्रणेने पोलीस अधिनियमाच्या कलमांतर्गत कारवाई करावाई करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी भवर यांनी राष्ट्रीय श्रीराम संघांचे अध्यक्ष शिंदे शिवसेनेचे नेते सागर बेग यांच्या हस्ते निवेदन स्वीकारले. याप्रसंगी जिल्हा प्रमुख सारिका राजेश वाव्हळ,सविता किशोर वाडीले,शहर प्रमुख समीर माळवे,सुनील शेळके,सुनील पाचोने,रवींद्र जाधव,किशोर वाडीले,अशोक तुपे, रोहित यादव, नितीन गाढे,मंगेश चव्हाण,नितीन क्षीरसागर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
