‘वंदे भारत’च्या थांब्यासाठी श्रीरामपूरातील सर्वपक्षीय एकवटले;बेलापूर रेल्वे स्टेशनवर निदर्शने

श्रीरामपूर-बेलापूर रेल्वे स्थानकावर वंदे भारत एक्सप्रेसला थांबा मिळावा, साई सुपरफास्ट पॅसेंजर रोज सुरू करावी तसेच कोरोना काळात बंद झालेल्या पॅसेंजर गाड्या...

श्रीरामपूर-
बेलापूर रेल्वे स्थानकावर वंदे भारत एक्सप्रेसला थांबा मिळावा, साई सुपरफास्ट पॅसेंजर रोज सुरू करावी तसेच कोरोना काळात बंद झालेल्या पॅसेंजर गाड्या पुन्हा सुरू करण्यात याव्यात या विविध मागण्यांसाठी सर्वपक्षीय रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष  त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे स्टेशनवर निदर्शने करण्यात आली. त्यावेळी रेल्वे स्टेशन मॅनेजर एम.पी. पांडे यांना माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, सिद्धार्थ मुरकुटे, सुभाष त्रिभुवन, गौतम उपाध्ये, रंजीत श्रीगोड राजेंद्र सोनवणे, मुक्तारभाई शहा संतोष डहाळे, रमाताई धीवर अमोल साबणे विठ्ठल गोराणे यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.
यावेळी बोलताना सुभाष त्रिभुवन म्हणाले,नव्याने सुरू झालेली नागपूर ते पुणे वंदे भारत ट्रेनला बेलापूरमध्ये थांबा नसल्यामुळे श्रीरामपूर-बेलापूर परिसरातील नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. या ठिकाणी थांबा दिल्यास प्रवाशांना सुविधा तर मिळेलच, शिवाय रेल्वेच्या उत्पन्नातही वाढ होईल.”
त्यांनी पुढे सांगितले की, “साई सुपरफास्ट पॅसेंजर सध्या आठवड्यात फक्त चारच दिवस चालते. ती दररोज सुरू करावी अशी नागरिकांची मागणी आहे. या ट्रेनमध्ये कायमच प्रवाशांची गर्दी असते, त्यामुळे ती रोज सुरू झाल्यास प्रवाशांचा त्रास कमी होईल आणि रेल्वेलाही त्याचा आर्थिक फायदा होईल.”कोरोना काळात बंद करण्यात आलेल्या पॅसेंजर गाड्याही तातडीने सुरू कराव्यात, अन्यथा सर्वसामान्य प्रवाशांचे हाल अधिकच वाढतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर मैसूर–वाराणसी एक्सप्रेस कोपरगावला दीड तास थांबते, पण बेलापूर-श्रीरामपूरला दोन मिनिटांचाही थांबा देत नाही, ही बाब अन्यायकारक असल्याचे त्यांनी नमूद केले.
जर या मागण्यांकडे रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही शेवटी त्रिभुवन यांनी दिला त्यावेळी राजू बत्रा बन्सीलाल फेरवानी तेजस गायकवाड अमोल काळे संतोष कांबळे  रॉकी लोंढे योगेश ओझा  भागचंद नवगिरे लहू खंडागळे राजेश वाव्हळ बाळासाहेब ठाकरे  विलास जाधव अल्ताफ  शेख राहुल शहाणे रईस शेख शाहरुख  मन्सुरी मिलिंद धीवर किशोर फाजगे बाळासाहेब जपे बाळासाहेब ढाकणे किशोर नागरे दीपक माखीजा रोशन बत्रा नितीन कापुरे किशोर गाडे सागर कुदळे प्रकाश पाटणी राहुल नाणेकर किशोर ऋषिकेश अवताडे अरुण बोराडे संभाजीराव देवकर नितीन  मासाळ भाऊसाहेब जाधव राकेश थोरात अल्ताफ पोपटिया,रिपाई भाजप मनसे राष्ट्रवादी शिवसेना मर्चंट असोसिएशन व्यापारी संघटना राष्ट्रीय जनसेवा पार्टी भारतीय लहुजी सेना संघटना भिम शक्ती मातंग अस्मिता सेना बहुजन क्रांती सेना गुरुनानक मार्केट व्यापारी वर्गआदी मोठ्या संख्येने उपस्थित होते

रेल्वे स्टेशन मॅनेजर एम.पी.पांडे यांना सर्वपक्षीयांच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!